फुले आणि शैव चिन्हधार्मिकी श्रीधर तिळवे नाईक ( संक्षिप्तीकरण )
मागील प्रकरणात चिन्हधार्मिकी आणि वाणीकि ह्यांचा संबंध आपण तपासला आता चिन्हधार्मिकी आणि फुले ह्यांचा संबंध तपासायला हवा महात्मा फुले समग्र वाङ्मयात फुल्यांचे विचार संकलित झालेले आहेत
ज्योतिराव फुल्यांनी बहुजनवादाचा पाया घालताना प्रस्थापित वैदिक धर्माची पाळेमुळे खणून काढतांना त्याची प्रस्थापित प्रतीके , प्रतीमा पूर्णपणे ठोकरून लावतांना ज्याला आज आपण देशी शैववाद म्हणू शकतो त्याची स्थापना केली बसवेश्वरांच्या लिगायत शैववाद आणि गुरूंनानकांचा ओंकार शैववाद ह्या दोन देशी शैववादाचा अभूतपूर्व संगम त्यांच्या शैववादात झालेला दिसतो बसवेश्वर जसा कर्नाटक गुरुनानक जसा पंजाबचा विचार शैवांच्या संदर्भात करत स्वतःची मांडणी करतात तशीच मांडणी फुले (ज्योतिराव आणि सावित्रीबाई दोघेही एकत्र ) महाराष्ट्राच्या संदर्भात करतात ते शैवाचा अवतार मानल्या गेलेल्या खंडोबाला केंद्रस्थानी आणतात बुद्धाला पाठिंबा देतात
आणि नवीन काळाच्या संदर्भात बसवेश्वरांनी जसा लिंगायत समाज निर्माण केला आणि नानकांनीं जसा शीख समाज निर्माण केला तसा नवा समाज निर्माण व्हावा म्हणून सत्यशोधक समाज निर्माण करतात बसवेश्वरांनी कुंडलसंगमदेव हे शिवाचे स्वरूप स्वीकारले तर नानकांनी ओंकार हे शिवाचे रूप स्वीकारले तसे फुले शिवाचे खंडोबा व मल्हारी हे मराठी रूप स्वीकारतात सावित्रीबाई मात्र महादेव शिव शंकर श्रीधर अशी अनेक रूपे स्वीकारतात
कायकवे कैलास म्हणजे कर्म हेच कैलास ही बसवेश्वरांची भूमिका होती श्रमाला पर्याय नाही आणि कोणतेही काम उच्च वा नीच असत नाही असे ते सतत सांगत हेच गुरुनानक सांगतात आणि त्यामुळेच भारतात भीक मागणाऱ्या भिकारांच्यात कधीही शीख आणि लिंगायत आढळत नाहीत फुल्यांचाही भर कर्मावर आणि श्रमावर आहे शैवांनी कायमच श्रमांना व श्रमिकांना प्रतिष्ठा दिली आहे कारण भारतीय श्रमिक शैव आहेत दुर्दैवाने मार्क्सवादाच्या हे कधीच लक्ष्यात आले नाही असो आज ना उद्या ते माओ व कॅस्ट्रो वैगरेंच्यातून बाहेर येऊन भारतीयांना भारतीय म्हणून नीट पाहतील तेव्हा त्यांच्या हे लक्ष्यात येईल
ना बसवेश्वर वर्णजातिव्यवस्था मानतात ना गुरुनानक ! फुले त्यांचा हा विचार अधिक अद्ययावत व जहाल करत वैदिक आणि वैष्णव धर्माच्या चिंद्या चिंद्या करतात
बसवेश्वर म्हणत कि मंदिर हे अंधश्रद्धा निर्माण करण्याचे केंद्र आहे त्यामुळे देहालय हेच देवालय माना अशी त्यांची शिकवण होती
सांगतील वेद शास्त्र ते मी प्रमाण मानणार नाही असे ते म्हणत त्यांचे सर्वाधिक गाजलेले वचन पुढीलप्रमाणे
"वेदक्के ओरेय कट्टवे,शास्त्रक्के निगळवनिक्कु वे,
तर्कद बेन्न बारनेत्तुव, आगमद मूग कोयिवे, नोडखा,
महादानी कुडलसंगमदेवा, मादार चेन्नय्यन, मनेय मग नामय्या."
तर्कद बेन्न बारनेत्तुव, आगमद मूग कोयिवे, नोडखा,
महादानी कुडलसंगमदेवा, मादार चेन्नय्यन, मनेय मग नामय्या."
वचन मराठीत :-
वेदावर चालवेन तलवार बेड्या ठोकेन शास्त्राला
तर्कशास्त्राच्या पाठीवर ओढेन आसूड
आगमशास्त्राचे कापेन नाक
मी प्रिय शिष्य मातंग चेन्नयाचा
कुडलसंगमदेवा.
वेदावर चालवेन तलवार बेड्या ठोकेन शास्त्राला
तर्कशास्त्राच्या पाठीवर ओढेन आसूड
आगमशास्त्राचे कापेन नाक
मी प्रिय शिष्य मातंग चेन्नयाचा
कुडलसंगमदेवा.
त्यांचा गुरु चेन्नय मातंग म्हणजे अस्पृश्य होते ते त्याचा उल्लेख गर्वाने करतात शैव ब्राम्हणाचा गुरु मातंग हे शैव धर्मात सहज शक्य आहे कारण शैव धर्म बाराव्या शतकातही वर्ण जात अस्पृश्यता मानत न्हवता आणि वैदिकांच्याविरुद्ध ह्याबाबत लढत होता
महात्मा फुलेंनी बसवेश्वरांच्या प्रमाणे वेदांवर तलवार चालवली त्यांच्या स्मृती शास्त्राला बेड्या ठोकल्या त्यांच्या बंडल तर्कशास्त्राच्या पाठीवर आसूड ओढले आणि नवे तर्कशास्त्र मांडले
महात्मा फुलेंनी बसवेश्वरांच्या प्रमाणे मानवतेची संकल्पना मांडली आहे ज्योतिबा म्हणतात
“स्त्री अथवा पुरुष, जे एकंदर सर्व गावाचे, प्रांताचे, देशाचे व खंडाचे संबंधात, अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात स्त्री आणि पुरुष या उभयतांनी, अथवा सर्व स्त्रियांनी अथवा पुरुषांनी, एकमेकांत, एकामेकांची कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटुंब समजून एकमताने एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करून राहावे
आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने , एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करते वेळी, मनुष्यास जन्मतः स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे कारण त्यास आपापसांत सारख्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे."
ह्यातील निर्माणकर्ता ही संकल्पना जितकी शैव आहे तितकीच ख्रिश्चन आहे कारण ज्योतीबांच्यावर ज्यू स्कुलमधील एकेश्वरवादाचा प्रचंड प्रभाव होता जो तत्कालीन शिक्षणातून आला होता एकार्थाने शिव , गॉड व अल्लाह ह्या तिन्ही संकल्पना एकत्र करून त्यांनी निर्माण कर्ता ही संकल्पना मांडली आहे
प्रश्न असा आहे कि हे सर्व करतांना ज्योतिबा चिन्हधार्मिकीविरुद्ध उभे ठाकताना नेमके काय करतात
१ ते वैज्ञानिक तर्कशास्त्रीय पद्धतीचा अवलंब करतांना तत्कालीन भटाळलेली भाषा साफ नाकारतात व बहुजनांच्या अस्सल मराठीचा वापर करतात
२ ते वैदिकांनी पुराणाद्वारा निर्माण केलेला शैव पंथ नाकारून जाणीवपूर्वक खन्डोबा व मल्हारी ही अस्सल शैव देशी मराठी प्रतीके निवडतात व त्यांचे देवत्व काढून घेऊन त्यांच्या मूळ वीरगाथेकडे न्हेतात ही वीरगाथा खरी का खोटी ह्याचे कसलेही पुरावे आपल्याकडे नसल्याने जी अडचण आपली होते तीच फुल्यांची होते त्यामुळे चिन्हधार्मिकीतील श्रद्धा स्वीकारण्याखेरीज
दुसरा कसलाही पर्याय आपणापुढे रहात नाही एका अर्थाने वैदिक श्रद्धा रिप्लेस करून नवी श्रद्धा स्थापन करण्याचा प्रयत्न फुले करतात जी अधिक रॅशनल आहे
३ शैवांचे यमनियम फुले अधिक सामाजिक परिप्रेक्ष्यात उभे करतात मात्र बसवेश्वर व नानकांच्या प्रमाणे त्यांचा मोक्षावर विश्वास असावा असे वाटत नाही त्यामुळे नानक व बसवेश्वर जसा मोक्षाचा प्रयत्न करतात तसा फुले प्रयत्न करत नाहीत ह्याबाबत ते ज्युडाइक होतात मात्र कयामतीवरही ते विश्वास ठेवतात असं वाटत नाही त्यामुळे ते पूर्ण ज्युडाइकही होत नाहीत
४ खन्डोबा बळी व मल्हारीला ते पूर्वज मानून त्यांच्या पूजेला ते पूर्वजांची पूजा मानतात तसा पूर्वज पूजेचा आकार देतात प्रत्यक्ष बहुजन त्यांना पूर्वज म्हणून पूजतात असे मला वाटत नाही
५ फुल्यांचा निर्माणकर्ता मात्र पूर्वज नाही तर तो ईश्वर आहे तो दयाळू आहे व समानता मानणारा आहे माणूस अनेकदा स्वतःला हवा तसा देव निर्माण करतो फुल्यांनी त्यांना हवा तसा देव निर्माण केला व त्याला निर्माणकर्ता असे नाव दिले असेच वाटत राहते
६ मला असं वाटतं कि फुले आतून नास्तिक असावेत पण बहुजन समाजाला नास्तिकता झेपणार नाही हे ओळखून ते मानवतावादी आस्तिक धर्म देऊ पाहतात
हे करण्यासाठी ते वैदिक प्रतीकांची टर उडवतात त्यांच्याविरुद्ध
राळ उडवतात त्यांची अवतारमीमांसा ह्या दृष्टीने पाहण्यासारखी आहे ते इथे दंतकथा खरवडून काढून इंद्र , वामन , नरसिंह परशुराम ह्यांना आर्य मानतात व आर्यांचे पूर्वज म्हणून त्यांना पाहतात म्हणजेच दंतकथांना पूर्वजकथा म्हणून मानण्याची त्यांची चिन्हशैली ते विरोधकांनाही लागू करतात त्यामुळे सर्व देव मानुषीकरण होऊन मनुष्य होतात ह्यातला विरोधाभास असा कि ते फक्त देवांचे मानुषीकरण करून थांबत नाहीत तर त्यांच्या चमत्काराचे वास्तविकरण करून आर्यांच्या लबाडीमुळे हे खोटे चमत्कार लिहिले गेले असे ते दाखवतात त्यांना कॉन्स्पिरसी थेरीचे स्वरूप देतात आणि ही कॉन्स्पिरसी आपण उलगडून दाखवत आहोत अशा थाटात ते बोलत राहतात
फुल्यांची लिखित भाषा ही अनेकदा वाणीकिच असते संभाषणांचे लिखित रूप असते आर्यांची धार्मिकी उध्वस्त करणे हा त्यांचा उद्देश असतो
ह्यातून पुढे प्रश्न उदभवतो कि फुले आर्यांची मीमांसा करताना दंतकथात्मक अभ्यासाला का कवटाळतात ?
पहिले कारण असे कि बहुजन समाज हा आर्यांनी निर्माण केलेल्या दंतकथांच्या भोवऱ्यात सापडला आहे त्यामुळेच त्याला त्यातून बाहेर काढायचे असेल तर दंतकथांचीच रॅशनल मीमांसा करायला हवी असे त्यांना वाटले असणार
दुसरे कारण आर्यांचा इतिहास हा ऐतिहासिक तथ्यांवर कमी व पौराणिक कथांच्यावरच अधिक आधारलेला आहे त्यामुळे त्यांनाही दंतकथांच्या आधारेच मीमांसा करावी लागली असणार
त्याउलट शिवाजी महाराजांचा प्रश्न येताच ते दंतकथा वगळून तिला वास्तववादी वीरगाथेचे स्वरूप देतात म्हणूनच ते शिवाजीची पूजा करतात एकंदरच वीर पूर्वजांची पूजा ज्योतीबांना आवश्यक वाटते आणि रॅशनल असूनही ते ही पूजा का करतात असा प्रश्न येतो आणि मग इथे त्यांच्यावरच्या शैव संस्काराची प्रखर जाणवते
प्राचीन काळापासून शैव दोन प्रकारच्या पूजा करतात १ मोक्षु लोकांची म्हणजे ज्यांना मोक्ष मिळाला आहे त्यांची पूजा २ जे वीर समाजाचे काही भले करणारे झाले त्यांची पूजा
ह्यातील मोक्षु लोकांची पूजा ज्योतिबा टाळतात तर जे त्यांना समाजाचे भले करणारे वीर आहेत असे वाटते त्यांची मात्र ते आवर्जून पूजा करतात ह्याचे कारण स्पष्ट आहे ज्योतीबांना मोक्षात रस नाही त्यामुळे शिव पार्वती गणपती स्कंद गोरखनाथ रवळनाथ वैग्रे वैग्रे मोक्ष मिळवलेल्या लोकांची पूजा ते करत नाहीत पण ज्योतिबा , खंडोबा , मल्हारी , छत्रपती शिवाजी हे त्यांच्या दृष्टीने शैव वीर असल्याने ते त्यांची चिन्ह प्रतीक बनवून पूजा करतात तर शिवाची पूजा मात्र ते निर्माणकर्ता म्हणूनच पूजा करतात
ज्योतिबा फुलेंनी पारंपरिक प्रतीकांचा अर्थ पूर्ण उलटापुलटा करून काही नवीन प्रतीके सशक्त केली हे त्यांचे चिन्हधार्मिकीला मिळालेले सर्वात मोठे योगदान आहे त्यांनीच शिवाजी हा शैव राजा खऱ्या अर्थाने शैव म्हणून प्रस्तुत केला व त्याच्यामागचे गोब्राम्हणप्रतिपालक बिरुद काढून घेऊन कुळवाडीभूषण हे नवे बिरुद त्याला प्राप्त करून दिले व भटांच्या तावडीत सापडलेला महाराजांचा इतिहास हा सोडवून तो बहुजनांमुख केला
( संक्षिप्तीकरण )
श्रीधर तिळवे नाईक
===================================================================
फुले आणि शैव चिन्हधार्मिकी भाग दोन श्रीधर तिळवे नाईक ( संक्षिप्तीकरण )
फुल्यांनी मराठी भाषा अधिक बहुजनवादी केली आणि ब्राम्हण प्रतिकांना उध्वस्त करून त्याजागी बहुजनवादी प्रतीकं आणली तरीही जे यश बसवेश्वरांना किंवा नानकांना मिळाले ते फुल्यांना का मिळाले नाही लिंगायत समाज वा शीख समाज जसे आकाराने व संख्येने वाढत गेले तसे सत्यशोधक समाजाचे का झाले नाही
ह्याची कारणे स्पष्ट आहेत
१ सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बसवेश्वर व नानक ह्यांना मोक्षात रस होता आणि त्यांना तो मिळाला ज्योतीबांना हा रस निर्माणच झाला नाही कारण जुडाईक धर्मात मोक्षाची कल्पनाच नाही त्यामुळे सामाजिक अजेंडा हाच सत्यशोधक समाजाचा अजेंडा होता असा अजेंडा धर्मसमाज निर्माण करतो धम्म नाही
२ मोक्ष हा शैव धम्माचा कणा आहे तोच काढून घेतला तर मग उरते काय ? राजाराम मोहन रॉय केशवचंद्र सेन दयानंद सरस्वती ह्यापैकी कुणालाच मोक्षप्राप्ती झाली नाही त्यामुळे ह्यांचे समाज हे समाजच राहिले फुले हेही ह्यांच्या वाटेने गेले त्यामुळे फुल्यांचाही समाज फक्त समाज राहिला बहुजन समाजाचा समाज हे त्याच वैशिष्ट्य मात्र अनन्यसाधारण होते ब्राह्मो समाज प्रार्थना समाज व आर्य समाज हे शेवटपर्यंत ब्राम्हणी राहिले त्यातल्यात्यात आर्य समाज क्षत्रिय , वैश्य ह्यांच्यात पसरला पण ओबीसीतील त्यांचा प्रसार मर्यादित होता त्यापेक्षा ज्योतिबा फुलेंचा ओबीसींच्यातला प्रसार हा अधिक व्यापक झाला पण दुर्देवाने नंतर ब्राम्हण ब्राम्हणेतर वादाचे स्वरूप त्याला प्राप्त झाले आणि ब्राम्हण समाजात त्याची लोकप्रियता जवळ जवळ शून्य झाली
३ जसा अटॅक फुल्यानी केला तसा अटॅक आर्य , ब्राम्हो व प्रार्थना समाजांनी केला नाही उलट आम्ही जुन्या धर्माचे खरे स्वरूप सादर करतोय असा त्यांचा दावा होता फुल्यांनी मी शैव धर्म नव्या स्वरूपात सादर करतोय असा दावा कधीच केला नाही उलट मी नवा धर्म स्थापन करतोय असा त्यांचा दावा असल्यासारखे त्यांचे प्रेझेंटेशन होते जे समाजाच्या पचनी पडले नाही
४ सत्यशोधक समाजावर पडलेला सर्वात मोठा प्रभाव ख्रिश्चन व इस्लाम होते फुल्यांचा निर्मिक शैव कमी व ज्युडायिक जास्त होता इस्लामप्रमाणे त्यांनी पुरोहित नावाचा मध्यस्थ नाकारला
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक,
भांडणे अनेक
कशासाठी
असे त्यांनी
म्हंटले असले तरी हे म्हणणेही इस्लाम व ख्रिश्चन ह्यांच्यासारखेच होते ख्रिश्चन
पुरोहित्यांनी पुरवलेल्या आधारावर फुल्यांनी धर्म निर्माण केल्याने त्यांच्या
धर्मात मोक्षाला जागा न्हवती त्यामुळे हा धर्म ना शैवांच्यात बसेना ना हिंदूंच्यात
ना जैनांच्यात ना बुद्ध धर्मात
कयामतीची कल्पना
नसल्याने तो जुडाईक धर्मातही बसेना असा कशातही मूळ न पकडणारा धर्म केवळ नवतेवर उभा
राहू शकतो ज्योतीबांनी सगळे धर्म ठामपणाने नाकारले असते तर कदाचित नवा धर्म म्हणून
त्याचा विचार करता आला असता पण तसेही काही न्हवते त्यांचे महंमद व ख्रिस्तावरचे
प्रेम अनेकदा व्यक्त होत राहिले ते एका अर्थाने समाजाधिष्ठित धर्म स्थापन करणारे
प्रॉफेट बनण्याच्या भूमिकेत होते पण इथेही एक गोची होती जिझस व पैगंबर ह्यांनी जसा
थेट सत्ताधारींशी पंगा घेतला तसा पंगाही त्यांना ब्रिटिश शासनाशी घ्यायचा न्हवता
उलट ते ब्रिटिश शासनाचे कट्टर समर्थक होते ह्या सगळ्या गुंतागुंतीतून जी गोची
व्हायची ती झाली ही गोची कलोनियालिज्मला बळी पडल्याने झाली होती फुले प्रॉफेट तर
झाले पण ह्या प्रॉफेटने सत्याधाऱ्यांशी जुळवून घेतल्याने त्याला झळाळी प्राप्त
झाली नाही
५ जेव्हा असा प्रॉफेट निर्माण होतो तेव्हा मग त्या प्रॉफेटचे भविष्य त्याच्या शिष्यांच्या हातात असते असा कुठलाही समाज निर्माण झाला कि त्याला पुढे जो खंबीर वारसदार मिळतो तो त्या समाजाचे काय करतो हे फार महत्वाचे असते फुलेंचा सर्वोत्तम शिष्य बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेब आंबेडकरांनी जर सत्यशोधक समाज स्वीकारला असता तर महाराष्ट्राची परिवर्तनवादी चळवळ पूर्णपणे सत्यशोधक समाजाच्या हिशेबाने चालली असती पण बहुदा बाबासाहेबांना सत्यशोधक समाजात निर्वाणाची संकल्पना नाही हे कळून चुकले आणि खुद्द बाबासाहेबांना निर्वाण हवे असल्याने निर्वाण नसलेला सत्यशोधक समाज स्वीकारणे त्यांना जड गेले असणार त्यामुळे फुल्यांच्या सर्वोत्तम शिष्यानेंच त्यांचा सत्यशोधक समाज स्वीकारला नाही हीच गोष्ट शाहू महाराजांची त्यांना सत्यशोधक समाजाबद्दल आपुलकी होती पण त्यांनी आर्य समाज स्वीकारला थोडक्यात फुलेंच्या दोन्ही शिष्यांनी सत्यशोधक समाज नाकारल्याने त्याचा प्रसार होण्याची शक्यताच संपुष्टात आली मग बाकी जी प्रभावळ होती तिच्यापैकी कुणाकडेच समाजधर्म वाढवण्याची ताकद न्हवती ह्याचा परिणाम असा झाला कि प्रॉफेट तर जन्मला पण शिष्य लाभले नाहीत अश्या व्यस्त समीकरण तयार झाले
फुले जर मिशनरी प्रभावापासून मुक्त राहते तर त्यांच्या रूपाने एक मोठा क्रांतिकारक धर्म लाभला असता पण हे झाले नाही
ह्याचा अर्थ मग आपण गप्प बसावे का तर नाही शैवांची नवीन गणिते जुळून आपण पुन्हा एकदा नवी झेप घेऊ शकतो ह्या झेपेत फुलेवाद तर असेलच पण त्याचबरोबर शैव धम्मही असेल आणि अर्थात चौथी नवताही असेलच
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment